मुख्य सामग्रीवर वगळा

पैठणच्या संतपीठाचा अभ्यासक्रम जूनपासून सुरू करावा-पवार

मुंबई, ता. १ - पैठण (जि. औरंगाबाद) येथील संतपीठातील अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले आहेत.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात संतपीठाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिक कार्यमंत्री संजेय देवतळे, राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार संजय वाकचौरे, प्रकाशमहाराज बोधले आदी उपस्थित होते.
संतवाड़्मयाचे शिक्षण देणारे देशातील हे एकमेव संतपीठ असून तीनवर्षांपूर्वी या संतपीठाची स्थापना झाली आहे. सर्व पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. संतपीठातील अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्गाच्या भरतीच्या प्रक्रियेबाबत दोन महिन्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरवात करावी. तसेच संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत देखील प्रक्रिया सुरू करण्यात यावी.
श्री. टोपे म्हणाले, की संतपीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हस्तांतरीत करण्याबाबत संबंधितांना पत्र दिले जाईल. यानंतर अभ्यासक्रमाबरोबर आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली जाईल.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012