मुख्य सामग्रीवर वगळा

सर्वसामान्यांना दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, ता. २५ - रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ नाही, तसेच मुंबईसह राज्यातील विविध शहरे एकमेकांशी जोडणार्‍या नव्या रेल्वेगाड्यांच्या घोषणेमुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्ते केली आहे.
श्री. पवार यांनी म्हटले आहे की, नागपूर-कोल्हापूर, पुणे-नांदेड, नागपूर-भुसावळ, मुंबई-सावंतवाडी रोड आणि मुंबई-मनमाड या नव्या गाड्यांच्या घोषणेमुळे राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळण वाढणार आहे. राज्याच्या सर्वंकष विकासासाठी ही बाब महत्वाची ठरेल. देशातील प्रमुख महानगरांसाठी केलेली एकात्मिक उपनगरीय रेल्वे नटेवर्क प्रकल्पाची घोषणा मुंबईच्या दृष्टीनेही महत्वाची ठरणार आहे. त्यातून मुंबईतील उपनगरीय सेवा तसेच मेट्रो आणि रेल्वेशी संबंधित इतर बाबींचा कार्यक्षमपणे आणि गतीने विकास होईल. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वेच्या ४७ नव्या फेऱ्या वाढणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्यास मदत होईल. विशेषतः ठाणे बेलापूर पट्ट्यातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या ठाणे-वाशी मार्गावरील वाढीव फेर्‍यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाकुर्ली (ठाणे) येथे ७०० मेगावॉट क्षमतेचा गॅस पॉवर प्रकल्पही उभारला जाणार आहे. त्याचबरोबर गडचिरोलीला नव्या रेल्वे मार्गाने जोडले जाणार असल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात कुठलीही वाढ न केल्यामुळे महागाई आटोक्यात राहण्यास मदत होईल. ई-तिकिटांच्या आरक्षण शुल्कातही कपात करण्यात आली आहे. शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अपंगांसाठी दिलेली सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाढीव सवलतीसह विविध घोषणांमुळे हा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने आम-आदमी चा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया देखील यावेळी श्री. पवार यांनी व्यक्त केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012