मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिकेचा रॉबी हंटर 'मुंबई सायक्लोथॉन' चा विजेता

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. १३ - अत्यंत उत्साहात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मुंबई सायक्लोथॉन 'टूर द मुंबई-२०११' मध्ये आज अमेरिकेच्या रेडिओशेक टीमच्या रॉबी हंटर याने राजीव गांधी सागरी सेतूच्या साक्षीने १०४ किमी. चे अंतर पार करून विजेतेपद पटकाविले. इटलिच्या लिक्विगॅस टीमचा इलिया व्हिव्हियानी आणि यूके मोटरपॉईंट टीमच्या जॉनी एकव्हॉय यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे १५ हजार, सहा हजार आणि तीन हजार युरोचे बक्षीस मिळाले.
भुजबळ फाऊंडेशन, आयडी स्पोर्ट्स, युनियन सायक्लिक इंटरनॅशनल आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सायक्लोथॉनमध्ये १२ देशांचे विविध संघ तसेच तीन देशांच्या राष्ट्रीय संघांच्या सुमारे १०८ स्पर्धकांनी भाग घेतला. यासह २८ किलोमीटरची ऍमॅच्युअर राईड, प्रत्येकी १५ किलोमीटरच्या कॉर्पोरेट व ग्रीन राईड्स, ३ किलोमीटरची किड्स राईड अशा अन्य विभागांमध्ये एकूण ९५०० पेक्षा अधिक सायकलस्वारांनी सहभागी होऊन "पर्यावरण रक्षणासाठी सायकल चालवा" हा संदेश दिला.
१२ आंतरराष्ट्रीय संघांव्यतिरिक्त भारताच्या स्पर्धकांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यात अमरदीपसिंग, सी. राजेश (दोघेही भारतीय रेल), सोम वीर, विनोद मलिक, सतबीरसिंग व अतुल कुमार (सर्व इंडियन आर्मी) यांचा समावेश होता. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, कृपाशंकर सिंह, आमदार पंकज भुजबळ आदींच्या हस्ते फ्लॅग राईड करण्यात आले. आयडी स्पोर्ट्स चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अकील खान यांनी परीश्रम घेतले. डेव्हिड मॅक्वेड यांनी रेस डिरेक्टर म्हणून काम पाहिले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012