मुख्य सामग्रीवर वगळा

अमेरिकन काँग्रेसकडून भुजबळांना भेटीचे निमंत्रण

IndiBlogger - The Largest Indian Blogger Community 
मुंबई, ता. २३ - राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना अमेरिकन काँग्रेसकडून भेटीचे निमंत्रण देण्यात आलेआहे. अमेरिकेस भेट देण्याचे हे निमंत्रण तेथील संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीअंतर्गत असलेल्या आशिया-पॅसिफिक विषयक उपसमितीचे रँकिंग मेंबर एफ. एच. फॅलेओमावेगा यांनी पाठविले आहे.
श्री. भुजबळ यांना वॉशिंग्टन डी.सी. येथे अमेरिकन काँग्रेसच्या वरिष्ठ सदस्यांची भेट घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक सुदृढ करण्यासाठी आणखी कोणते प्रयत्न करता येऊ शकतील, यादृष्टीने चर्चा करण्याची अपेक्षा निमंत्रणात व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या १० जानेवारी ११ ला अमेरिकेतील नॉर्थ डकोटा प्रांताचे सिनेट लीडर रॉबर्ट स्टेनजेम यांच्या नेतृत्वाखाली महिला लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेतली होती. भुजबळ यांच्या भेटीमुळे प्रभावित झालेल्या अलायन्स फॉर यूएस-इंडिया बिझिनेस या संस्थेचे अध्यक्ष संजय पुरी यांनी अमेरिकन परराष्ट्र व्यवहार (आशिया-पॅसिफिक) उपसमितीचे रँकिंग मेंबर व यूएस-इंडिया ट्रेड काँग्रेशनल टास्क फोर्सचे उपाध्यक्ष एफ. एच. फॅलेओमावेगा यांना भुजबळ यांच्याविषयी सांगितल्यानंतर थेट निमंत्रणच पाठविण्यात आले आहे. उभय देशात व्यवसाय-व्यापार तसेच विविध क्षेत्रात संधींबाबत ही भेट उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012