मुख्य सामग्रीवर वगळा

'डेक्कन-ओडिसी' तून ७५ परदेशी पर्यटकांनी घेतले महाराष्ट्र दर्शन




मुंबई, ता. २४ - महाराष्ट्राची लक्झरी ट्रेन 'डेक्कन-ओडिसी' ने बर्‍याच कालावधीनंतर नियमित सहलमार्गावर धाव घेतली. दिनांक १६ ते २३ फेब्रुवारी २०११ या कालावधीत या गाडीतून सुमारे ७५ परदेशी पर्यटकांना महाराष्ट्राची सफर घडविली असल्याची माहिती आज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) देण्यात आली.
'डेक्कन-ओडिसी' मुंबई, सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, गोवा येथील प्रसिद्ध गिरजाघरे, समुद्रकिनारे, कोल्हापूर येथील शालिनी पॅलेस, न्यू पॅलेस, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला, ताडोबा अभयारण्य, नाशिक येथील गोदावरी घाट आणि प्रसिद्ध मंदिरे इ. ठिकाणांना पर्यटकांनी भेट दिली. सहलीदरम्यान पर्यटकांचे ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककलांचे दर्शन घेडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या हंगामात डेक्कन ओडिसीच्या ८ सहली करण्याचा प्रयत्न होता, तथापि पर्यटकांच्या अल्प प्रतिसादामुळे नोव्हेंबर व फेब्रुवारीमध्ये प्रत्येकी एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वेची अवास्तव हॉलेजची मागणी, सहलीच्या महसूलातील वाटा, एमटीडीसीचा सहलींवरील अन्य खर्च यामुळे सुारे २५.२१ लाख रुपयांचा तोटा झाला होता. याउलट फेब्रुवारीतील सहलीत पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रतिमाणशी प्रतिदिन ५०० डॉलर (रु. २२ ,५००/-) इतका आकार घेऊनही नफा कमी होणार आहे. महामंडळाने डेक्कन ओडिसीच्या काही सहली भाडेतत्वावर घेतल्या असून त्या नवी दिल्ली, आग्रा, सवाई माधोपूर, जयपूर, उदयपूर या मार्गावर धावत आहेत. या सहलींमधूनही पर्यटकांना किमान ३ दिवस महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद व अजिंठा या ठिकाणी फिरविण्यात येते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012