मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्हा नियोजनाच्या आराखड्यात कुस्ती, कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी

मुंबई, ता. २० - देशी खेळांना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन आराखड्यात कुस्ती आणि कबड्डीच्या मॅटसाठी तरतूद करावी, तसेच महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या मानधनासंदर्भातील वय आणि उत्पन्न अट शिथील करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या कुस्तीगिरांच्या विविध मागण्या आणि कुस्ती स्पर्धांचे धोरण ठरविण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. युवक कल्याण आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी, वित्त विभाग मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव धनंजय धवड, क्रीडा व युवक संचालनालयाचे संचालक नरेंद्र सोपल, कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते.
मानधनासाठी खेळाडूंचे वय ५० वर्षाहून अधिक असणे आवश्यक आहे, परंतू हिंदकेसरी, महान भारतकेसरी आणि रुस्तम-ए-हिंद किताब विजेत्यांना वय व उत्पन्नाची अट नाही. याच धर्तीवर महाराष्ट्र केसरी किताब विजेत्यांना असणारी उत्पन्नची अट शिथील करावी अशी कुस्तीगिरांची मागणी होती. याविषयी प्रस्ताव वित्तविभागाकडे सादर करावा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशा किताब विजेत्यांना एसटी बस प्रवास सवलत लागू करावी. शिवाय शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंसाठीची एसटी प्रवास सवलत कूपनची मर्यादा ५०० रुपयांवरून एक हजार रुपयांपर्यंत वाढवावी असे निर्देश पवार यांनी दिले.
स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेस आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा विचार केला जाईल. यासाठी क्रीडामंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि कुस्तीगिरांनी चर्चा करून आराखडा सादर करावा असेही पवार यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012