मुख्य सामग्रीवर वगळा

अल्पसंख्यांक समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - अजित पवार

मुंबई, ता. १८ - अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, अल्पसंख्यांक समाजातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या, अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री खान यांनी राज्यात या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी समित्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अल्पसंख्यांकांच्या विकासाबाबतच्या योजनांची चर्चा व्हायला हवी अशी मागणी केली. यानुसार श्री. पवार यांनी चर्चेबाबत दुजोरा देऊन आणि त्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करावे अशा सूचना दिल्या.
बैठकीस शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण व अल्पसंख्यांक विकास विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान, अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष नसीम सिद्दिकी, आमदार नवाब मलिक, शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव संजयकुमार, वित्तविभाग प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, महिला व बालकल्याण विभाग प्रधान सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012