मुख्य सामग्रीवर वगळा

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत वसई कृत संगीत संशयकल्लोळ द्वितीय

मुंबई, ता. १६ - राज्य शासनाने आयोजित केलेल्या ५० व्या महाराष्ट्र राज्य व गोवा संगीत नाट्य स्पर्धेत वसई येथील मन्वंतर कला मंडळाने सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले.
सांगली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या पाईकदेव  भोलनाथ संस्थेच्या संगीत मीरा मधीरा या नाटकास ३५ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. कै. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ चे दिग्दर्शन हृदयनाथ कडू यांनी केले होते. अश्विनीशेठ ची भूमिका करणारे दशरथ राऊत यांना साभिनय गायनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. कृत्तिकेची भूमिका करणारी श्रीयंका देसाई व भादव्याच्या भूमिकेसाठी महेश पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. ऑर्गन व तबल्यासाठी श्रीरंग परब व श्रीनिवास शेंबेकर यांना प्रथम पारितोषिक मिळाले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012