मुख्य सामग्रीवर वगळा

प्रेमासाठी..वाट्टेल ते...!!!

प्रेमात सर्व काही माफ असतं..प्रेम हे आंधळं असतं! असं म्हणतात नां..? होय अगदी खरं आहे ते..आता हेच बघा नां...
प्रेमात अक्षरशः चिंब झालेल्या एका युवकाने त्याच्या प्रेयसीच्या अटी लग्नापूर्वीच तिला लिखित स्वरूपात म्हणजेच स्टँप पेपरवर लिहून दिल्या. अटींप्रमाणे लग्नानंतर हा पती ठरलेल्या वेळेत घरी आला नाही, तेव्हा त्याला बिचार्‍याला लिहून दिल्याप्रमाणे चक्क रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले.
सन २००७ मध्ये या जोडप्याने लग्न केले होते. हे नवरोबा कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे बहुदा नेहमीच घरी परत यायला उशीर होतो. नवरोबा मदिरालयात जाऊन मदिरा प्राशन तर करुन आले नाही नां? याची शंका त्यांच्या सौभाग्यवतीला येत होती.
नवरोबाने हबीबगंज (भोपाळ नजीक) पोलिस ठाण्यात जाऊन बायकोविरुद्ध तक्रार केली, दोघांनाही ठाण्यात बोलावून समजाविण्यात आले आणि स्टँप पेपरवर असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आला. पाहूया या अटी तरी कोणत्या होत्या..?
अटी अशा-
१). एका वेळचा स्वयंपाक बायको आणि एका वेळचा नवरोबांनी करावा.
२). संध्याकाळी सातच्या आत घरात..अन्यथा नवरोबांनी बाहेर झोपावे.
३). रात्री नऊनंतर टीव्ही बंद.
४). पे अकाउंट दोघांचे संयुक्त खाते असेल.
५). घर खर्चात सुरवातीला नवरोबाचे पैसे वापरले जातील.
६). घर खरेदीची रजिस्ट्री (व्यवहार) सौभाग्यवतींच्या नावावर होतील.
७). सौं. नी मोबाईलवर कॉल केल्यानंतर लगेच पिक केला जाईल, टाळंटाळ करणार नाही.
८). दारू सौं. ना विचारून नंतरच प्यावी.
९). नवरोबा आपल्या आईस भेटण्यास जाणार नाही.

नवरोबांवर अशा नऊ अटी लादून प्रेयसी त्यांची सौभाग्यवती झाली होती.
# @ असलं प्रेम नक्कोच नको.. प्रेमासाठी वाट्टेल ते..म्हणतात नां, ते हेच!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012