मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षितीजावर तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला

मुंबई, ता. २४ - पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राच्या क्षितिजावर तेजाने तळपणारा 'स्वरभास्कर' मावळला, या शब्दात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
किराणा घराण्याचे शिष्य असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांचे ख्याल गायकीवर प्रचंड प्रभुत्व होते. कन्नड, हिंदी आणि मराठीमध्ये त्यांनी भक्तीगीते आणि अभंगांचे सादरीकरण केले. शास्त्रीय संगीतातील तज्ज्ञ आणि दर्दी रसिकांबरोबरच सामान्य नागरिकांच्या मनावरही त्यांनी गारूड केले. त्यांचा विशिष्ट खर्जातील आवाज आणि ताना घेण्याची पद्धत रसिकांवर मोहिनी घालत असे. अलिकडे, मिले सुर मेरा तुम्हारा..., आणि भारतबाला च्या राष्ट्रगीताच्या व्हिडिओमध्येही त्यांचे गायन आणि व्यक्तीमत्व यांची छाप अखिल भारतीयांच्या मनावर उमटली. पुण्यात सवाई गंधर्व पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्या गुरुंना आदरांजली वाहण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. त्यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्यासह अनेक शिष्यांची देणगी या गायकाने देशाला दिली असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, असेही श्री. भुजबळ यांनी म्हटले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012