मुख्य सामग्रीवर वगळा

हेलमेट सक्ती किती 'सुरक्षित'...!

काही वर्षांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना वाहन चालविताना हेलमेट लावणे आणि चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्यात आली. प्रारंभी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आणि पाठोपाठ काही प्रमुख शहरांमध्ये आणि नुकतेच मध्यप्रदेशातील इंदूर येथे हेलमेट सक्ती करण्यात आली आहे. हेलमेट सक्ती करणे किती परिणामकारक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे.


दुचाकी वाहनचालक, कारचालक अर्थात चारचाकी वाहनचालक वाहन भरधाव चालवितात. विशेषतः शहराबाहेर, शहरातील प्रमुख मार्गांवर, राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात होऊन अनेकदा यात वाहनचालकांचे जीव गमावल्याच्या घटना घडतात. दिवसेंदिवस या प्रकारे अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. अपघात झाल्यास किमान जीव गमावण्याची वेळ येऊ नये, "सर सलामत तो..." असे म्हणतात नां! याप्रमाणे न्यायालयाने दुचाकी वाहनचालकांसाठी वाहन चालविताना हेलमेट बेल्टसह लावणे अनिवार्य केले आहे. ठिकठिकाणी यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभा, चर्चासत्रांमध्ये प्रतिष्ठितांसह ज्येष्ठ नागरिकांनी देखील या सक्तीस दुजोरा दिला. हेलमेट न लावणाऱ्या वाहनचालकास दंड आकारण्याची तरतूद देखील करण्यात आली. वाहनचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीस देखील हेलमेट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. काही ठिकाणी हेलमेट लावण्यापासून महिला वाहनचालकांना सूट देण्यात आली आहे. परंतु अनेक शहरांमध्ये हेलमेट सक्तीस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून दिसून येते.

हेलमेट लावून वाहन चालविले तरीसुद्धा व्हायचे ते अपघात होणारच...ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही! इंदूरनजीक गौतमपुरा-चंबळ मार्गावर नुकत्याच झालेल्या एका अपघातात हेलमेट लावून दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकास झालेल्या अपघातात या वाहनचालकाच्या डोक्याचे हेलमेटसह तुकडेतुकडे झाले. आयएसआय मार्क असलेले हेलमेट घातले असले तरीही तुकडे झालेच. कोणत्यातरी डंपरसारख्या अवजड भरधाव वाहनाने त्याला ठोस मारल्यामुळे बऱ्याच दूरपर्यंत हा वाहनचालक फरपटत जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. यावरून हेलमेट लावून वाहन चालविणे देखील किती सुरक्षित आहे, हेलमेट लावून वाहन चालविणे किती सुरक्षित, जीव वाचविण्यासाठी लाभप्रद ठरते हे विचार करण्यासारखे आहे.

केवळ हेलमेट लावून आणि सीटबेल्ट लावून वाहन चालविण्यापेक्षा दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनचालकांनी (शासकीय वाहनचलकांसह) वाहन भरधाव न चालविता विशिष्ट मर्यादित वेगात वाहन चालविल्यास अपघातांचे प्रमाण नक्की कमी होईल. शासनाने देखील यावर गांभीर्याने विचार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल यात शंका नाही.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012