मुख्य सामग्रीवर वगळा

भुजबळ ठरले "सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट" विशेष पुरस्काराचे मानकरी

व्हिन्टेज ड्राइव्ह...आनंद लाँग ड्राइव्हचा...
मुंबई, ता. ३० - मंत्री जरी असलो तरीही आपण हरहुन्नरी असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी आज सिद्ध करून दाखविले. येथे आयोजित 'व्हिन्टेज कार रॅली' चे उद्घाटन करून त्यांनी अचानक चक्क रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला. चालवायला अत्यंत अवघड असलेल्या १९४७ ब्युईक कन्व्हर्टिबल चे स्टेअरिंग अत्यंत सफाईदारपणे हाताळले तसेच रॅलीचे संपूर्ण अंतर व्यवस्थित पूर्ण केले. अशी रॅली पूर्ण करणारे ते पहिलेच मंत्री ठरल्याने त्याचबरोबर सर्वात ज्येष्ठ ड्रायव्हर ठरल्याने त्यांना "द सिनिअरमोस्ट पार्टिसिपन्ट टू ड्राईव्ह इन द व्हिन्टेज कार रॅली" या विशेष पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. हॉर्निमन सर्कल ते बांद्रा आणि तेथून पुन्हा परत असा मार्ग या रॅलीसाठी निश्चित करण्यात आला होता. श्री. भुजबळ यांनी हे अंतर पूर्ण केले.
या गाडीचे मालक नितिन दोसा यांनी ही कार चालविण्यास अत्यंत अवघड असून लेफ्ट हँड ड्राइव्ह असल्याचे सांगितले. दरम्यान, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनतर्फे आयोजित रॅलीमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, एमटीएनएलचे व्यवस्थापक एस. पी. सिंग देखील सहभागी झाले होते. सुमारे १४७ प्रकारच्या दुर्मिळ व्हिन्टेज कार या रॅलीच्या निमित्ताने मुंबईत धावल्या.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमची मुंबई...

लोकल वेळेवर आली नाही म्हणजे झाले...हरी ओम् तत्सत्।

पवनचक्क्यांच्या अवजड सामुग्रीच्या वाहतुकीमुळे नुकसानग्रस्त रस्त्यांची जबाबदारी "महाऊर्जा" ची: भुजबळ

  मुंबई, ता. २४ - पवनचक्क्या उभारण्यासाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने स्वीकार ली पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले रस्ते किमान ५ वर्षे सुस्थितीत रहावे अशी अपेक्षा असते. तथापि, पवनऊर्जा प्रकल्पांसाठी लागणार्‍या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतुकीमुळे ते सुस्थितीत राहू शकत नाहीत व लवकर खराब होतात. याप्रकारे सांगली, धुळे, नंदूरबार, सातारा, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्ग असे सगळे मिळून सुमारे ६३५.५८ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. यांच्या दुरुस्तीची जबाबदारी अपारंपारिक ऊर्जा विभागाने घेतलीच पाहिजे. या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग घेईलही, मात्र त्याच्या खर्चाची तरतूद संबंधित विभागाने करावी असेही श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chokhi Dhani Indore....Welcome...!!! 2012