मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कसाब ला फाशी..लोकशाही, देशभक्तीचा विजय असो...

न्यायालयाने अतिरेकी कसाब याला फाशी ची शिक्षा ठोठावून खरोखर न्यायव्यवस्थेचा आदर्श घालून दिला आहे. देशातील नागरिक आणि लोकशाही, देशातल्या नागरिकांच्या देशभक्तीचा विजय असो...! आता लवकर तारीख ठरून प्रत्यक्ष कृती अपेक्षित.

कसाब साठी इतकी सुविधा क्यों-साsब?

कसाब बाबत न्यायालय आज निर्णय देईल. सगळ्याच भारतीयांना, देशभक्तांना त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, हीच अपेक्षा आहे. कसाब याला पोटाचे दुखणे..? असल्याची बातमी आज झळकली आहे. कदाचित त्याला भीतीने "पोटात दुखत असावे". पण भीती आणि कसाबला? कसे शक्य आहे? नाहीतर हे इतकं झालंच नसतं..। त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बुलेटप्रुफ कक्ष तयार करण्यात येणार आहे असेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. परंतु याची गरज तरी काय? इतक्या निरपराधांना ठार मारणार्‍यांना अशा सुविधा देऊन सहानुभूती कशाला हवी? पाकिस्तान मधील भारतीयांना, चुकून गुन्हेगार म्हणून पकडण्यात आलेल्यांना कशी वागणूक दिली जाते आहे, हे भारत सरकारला माहिती नाही काय? इतके करोडो रूपये खर्च करून सरकारला काय सिद्ध करायचे आहे? खरंतर, अशा प्रकारच्या गुन्हेगारांना थेट पोलिस किंवा संरक्षण यंत्रणांच्या ताब्यात दिले पाहिजे. यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर थेट फाशी..अशी तरतूद नव्याने करण्याची गरज आहे. कारण अशा अनेक अतिरेक्यांना अद्याप काहीच झालेले नाही. उलट त्यांची अशा प्रकारे सरबराई करणे म्हणजे त्यांच्यापुढे झुकण्यासारखे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अं

'चव्हाण' ते 'चव्हाण' एक प्रवास...

महाराष्ट्राच्या स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या पन्नास वर्षात राज्याने वीस मुख्यमंत्री पाहिले. विशेष म्हणजे राज्याचे पहिले मुख्यमंत्री (यशवंतराव) चव्हाण होते आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात देखील मुख्यमंत्रीपदी चव्हाणच विराजमान आहेत, हा निव्वळ योगायोगच...! १ मे १९६० ला महाराष्ट्राची स्थापना झाली. पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० पासून १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत धुरा सांभाळली. यशवंतराव चव्हाण यांचे 'आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' असेही वर्णन केले जाते. नावातच "यश" आणि "यशवंत" असल्यामुळे त्यांना प्रारब्ध भाग्य आणि नशीब दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य केले. ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी असेही त्यांना म्हणता येईल. गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना समाजातील तळागाळाच्या घटकांच्या समस्या ज्ञात होत्या, त्या दृष्टीने देखी